Tuesday, 25 November 2014

चुकत जाते..

निर्णय चुकतात आयुष्यातले
आणि
आयुष्य चुकत जाते..
प्रश्न कधी-कधी कळत
नाहीत
आणि उत्तर चुकत जाते..
सोडवताना वाटतं
सुटत गेला गुंता..
पण प्रत्येक वेळी नवनवीन
गाठ बनत जाते
दाखविणाऱ्याला वाट
माहित नसते..
चालणाऱ्याचे ध्येय मात्र
हरवून जाते..
दिसतात तितक्या सोप्या
नसतात काही गोष्टी..
"अनुभव"
म्हणजे काय हे तेव्हाच कळते...
असे मित्र बनवा
जे कधीच साथ सोडणार नाही..
असे प्रेम करा
ज्यात स्वार्थ असणार नाही..
असे हृद्य बनवा कि
ज्यालातडा जाणार नाही..
असे हास्य बनवा
ज्यातरहस्य असणार नाही..
असा स्पर्श करा
ज्यानेजखम होणार नाही..
असे नाते बनवा
ज्याला कधीच मरण नाही...
सुरेश भटांच्या चार सुंदर
ओळी..
आयुष्य छान आहे,
थोडे लहान आहे......
रडतोस काय वेड्या.?
लढण्यात शान आहे...
काट्यातही फुलांची झुलती
कमान आहे.....
उचलून घे हवे ते,
दुनिया दुकान आहे....
जगणे निरर्थक म्हणतो तो
बेइमान आहे.
"सुखासाठी कधी हसावं लागंत
तर कधी रडावं लागतं,
कारण सुंदर धबधबा बनायला
पाण्यालाही उंचावरुनपडावं
लागतं"...
RAVI KADAM 9730527308

No comments:

Post a Comment